सुरेश डुबल : टीम लय भारी
कराड : जगभरात कोरोनाने थैमान घातलेले आहे. देशाची अर्थव्यवस्थाही संकटात सापडलेली आहे. जगभरात भारताची नाचक्की होत आहे. या परिस्थितीत प्रत्येक देशातील राष्ट्रीय नेता पत्रकार परिषद घेवून कोरोनाच्या संकटाविषयी माहिती देत आहेत. मात्र भारत देशाचे राष्ट्रीय नेतृत्व (National Leader) करत असलेले नरेंद्र मोदी (Narendra Modi) या महाशयांनी सहा वर्षात एकही पत्रकार परिषद (Press Conferance) घेतलेली नसल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली.
आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, जगातील देशापुढे कोरोना विषाणू हे मोठे संकट आहे. अमेरिका, फ्रान्स असो कि अन्य देश त्यांचे राष्ट्रीय नेतृत्व करणारे (National Leader) पत्रकार परिषदा घेवून देशातील परिस्थितीची कल्पना विविध माध्यमातून जनतेला देत आहेत. त्यावेळी पत्रकार आपले जनतेचे प्रश्न विचारत आहेत. अनेकदा पत्रकार व नेत्यांमध्ये प्रश्नावरून खडाजंगी होत आहे. परंतु पत्रकार आपल्या घरातील प्रश्न विचारत नसतात. तर ते देशातील जनतेचे प्रश्न करत असतात. मात्र भारत देशाचे पंतप्रधान हे राष्ट्रीय नेते (National Leader) केवळ ‘मन की बात‘ (Mann ki baat) मधून लोकांशी बोलत आहेत, ते लोकांचे ऐकून घेत नाहीत. तेव्हा जगातील हा एकमेव राष्ट्रीय नेता आहे, ज्याने सहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही.
हे सुद्धा वाचा…
शरद पवारांच्या राज्यपाल भेटीमध्ये विधानपरिषदेच्या 12 जागांबाबत चर्चा
अनिल देशमुख रेल्वे मंत्र्यांवर संतापले, महाराष्ट्राची फजिती करण्याचा डाव आखल्याचा केला आरोप
देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर