टीम लय भारी
मुंबई : केंद्राच्या रेल्वे खात्याने मुंबईवरून पश्चिम बंगालला पाठविण्यासाठी तब्बल 34 रेल्वे गाड्या पाठवून दिल्या आहेत. त्यावरून गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी रेल्वे मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी रेल्वे खात्याला एक पत्र लिहिले आहे. त्यात महाराष्ट्रातून एकही गाडी पश्चिम बंगालला पाठवू नका अशी विनंती केली आहे. असे असतानाही रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्राची फजिती करण्यासाठी 34 रेल्वे गाड्या पाठवून दिल्या असल्याचा आरोप देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी केला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख नक्की काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच तोंडून
हे सुद्धा वाचा
Shivsena : देवेंद्र फडणवीसांचे आव्हान शिवसेनेने स्विकारले, आज देणार उत्तर