टीम लय भारी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांवर केलेल्या गैर वक्तव्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे नारायण राणेंनी सुरू केलेली भाजपाची जन आशीर्वाद यात्रा खंडीत झाली होती. आता ती पुन्हा सुरू होणार आहे (Jan Ashirwad Yatra will resume from Friday).
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रा शुक्रवार पासून पुन्हा सुरू होणार असे सांगितले आहे. नारायण राणेंना सूडबुद्धीने अटक करून महाविकास आघाडीने जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मंत्रालयात आणखी 25 अधिकाऱ्यांना पदोन्नती, शंभरजण पदोन्नतीच्या वाटेवर
सुडाणे कारवाई करायला आमच्या हातात सीबीआय किंवा इडी नाही – संजय राऊत
तसेच राणेंच्या पाठीमागे कोकणवासी खंबीरपणे उभे राहतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील असे ही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे (The people of Konkan will stand firmly behind Rane and bless us).
मंत्रालयात आणखी 25 अधिकाऱ्यांना पदोन्नती, शंभरजण पदोन्नतीच्या वाटेवर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूडबुद्धीने अटक करून जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचा प्रयत्न सत्ताधारी मविआने केला. मात्र, जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून पूर्ववत सुरू होत आहे. राणेसाहेबांच्या पाठीशी कोकणवासी खंबीरपणे उभे ठाकतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील, अशी खात्री व्यक्त करतो.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 26, 2021