टीम लय भारी
मुंबई :- आता हे सत्य बाहेर आलेच, अस म्हणत कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. आपले जुने ट्विट रिट्विट करत ते म्हणाले, किनारी वाळूमध्ये पुरलेले मृतदेह आता वर आली आहेत. हे सरकार आता उघडे झाले आहे. अशी त्यांनी सरकारवर टीका केली आहे (Jitendra Awhad Khadebol, now the truth has come out, the government is open).
गंगा नदीच्या वाळूत दफन केलेली मृतदेह वाहत नदी किनारी येत आहेत. यावर कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले जुने ट्विट, रिट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, “हे माझे ८ जूनचे ट्विट ज्यात मी नमूद केले होते कोरोनामुळे गंगेच्या किनारी वाळूमध्ये पुरलेले मृतदेह आणि उघडी झालेली सिस्टीम एक मृतदेह तर ऑक्सिजन नळी सहित होता. आता हे सत्य बाहेर आलेच.” असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
https://t.co/5U6CwVlktj pic.twitter.com/im1hPQ7kst
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2021
ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारला फटकारलं
मुख्यमंत्री घराबाहेर पडतच नाही, कोण आणि का म्हणाले…
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हणाले होते. जिंद़ा लाशों से तो अच्छी थीं ओ तैरती लाशें, जो मरने के बाद भी सिस्टीम को नंगा कर गई. अशा शायरी अंदाजाने जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला टोला लगावला होता (Jitendra Awhad Khadebol, now the truth has come out, the government is open).
मागील दोन दिवसांपासून गंगा नदीतून मृतदेह वर येत आहेत. स्थानिक प्रशासन ते मृतदेह बाहेर काढत आहेत. पाऊसचे आगमन होताच उत्तर प्रदेशातील गँगा नदीची पातळी वाढू लागली आहे. त्यासोबत गंगा नदीच्या वाळूत दफन केलेले मृतदेह वर येत आहेत. दफन केलेले हे मृतदेह कोरोना रुग्ण होते. असे आधीपासूनच सांगण्यात आले होते. यामुळे कोरोना वाढू शकतो. त्यामुळे तेथील प्रशासन समोर मोठे आवाहन उभे आहे.
नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या घामाचा वास सहन होत नाही, नाना पटोलेंनी काढला चिमटा
Jitendra Awhad visits Devendra Fadnavis, BJP says housing project for cops discussed
दोन दिवसांपूर्वी काढलेल्या फोटोमध्ये एक मृतदेह वाहत नदी किनारी आले होते. त्या मृतदेहाच्या शरीरावर भगव्या रंगाचे वस्त्र आहेत. तसेच मृतदेहाच्या हातात सफेद रंगाचा सर्जिकल हातमीजा आहे. एवढेच नव्हे तर एका मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजन ट्यूब असल्याचे दिसून आले. हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महापालिकेचे अधिकारी नीरज सिंह म्हणाले. मागील २४ तासांपासून ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तसेच यासर्वांचे अंत्यसंस्कार सर्व रीती प्रमाणे करत आहोत. या सर्व मृतदेहांचे अंत्यसंस्कार आम्ही करणार आहोत (Jitendra Awhad Khadebol, now the truth has come out, the government is open).
मागील महिन्यात बिहारच्या बक्सर जिल्ह्यातल्या चौसा स्मशान घाटात गंगा नदीत कमीतकमी 40 मृतदेह तरंगताना आढळून आले होते. मागील महिन्यातही उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक नद्यांमध्ये असे मृतदेह तरंगताना दिसून आले होते. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले हे लोक होते. या लोकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडे मिळत नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह गंगेत सोडले असे वृत्त होते.