टीम लय भारी
मुंबई : सातारा, सांगली व कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांत संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे सतर्क झाले आहेत. या तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना तांबे यांनी दिल्या आहेत ( Satyajeet Tambe alerted to Youth Congress workers ).
गेल्या वर्षी या तिन्ही जिल्ह्यांत भीषण महापूर आला होता. हजारो लोकांचे संसार उघड्यावर आले होते. गेल्या चार दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोळसत आहे. या तिन्ही जिल्ह्यांत पाऊस कोसळत आहे. पण गेल्या वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये होऊ नये यासाठी सरकारने अगोदरच खबरदारी बाळगली आहे. पण विविध राजकीय व सामाजिक संघटनाही सतर्क झाल्या आहेत.
हे सुद्धा वाचा
VIDEO : दूध दराबाबत निर्णय घ्यावाच लागेल, पण… : बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरातांनी टाकलेला शब्द अजितदादांनी तात्काळ केला पूर्ण
गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांविषयी बाळासाहेब थोरातांनी दाखविली कणव, अधिकाऱ्यांना लावले कामाला
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे. स्वतःची काळजी घेऊन जनतेच्या मदतीसाठी पुढे जावे. कुठल्याही प्रकारची मदत लागली तर तात्काळ प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधावा अशा सुचना तांबे यांनी केल्या आहेत. तांबे यांनी ट्विटद्वारे या सुचना केल्या आहेत ( Satyajeet Tambe instructed to his workers through tweet).
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व युवक काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांना सूचना आहे की,
👉 आपापल्या जिल्ह्यातील पुर परिस्थितीवर लक्ष ठेवावे.
👉 जनतेच्या मदतीसाठी स्वत:ची काळजी घेऊन पुढे रहावे.
👉 कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास तात्काळ प्रदेश काँग्रेस कार्यालयाशी संपर्क करावा.— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 6, 2020