लोकसभा निवडणूकीच्या (Lok sabha election) पार्श्वभूमिवर सत्ताधाऱ्यांसह विरोधक जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच प्रत्यय शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या सभेत आला. काल बारामती येथे शेतकरी-कामगार मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) तोफ डागली. सात वर्षांपूर्वी मोदींनी केलेल्या विधानाची आठवण करुन देत पवारांनी कोपरखळी मारली.
सात वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यात घेतलेल्या एका सभेत ‘शरद पवारांचे बोट धरून मी राजकारण शिकलो’, असं विधान केलं होतं. हेच विधान पकडत पवरांनी (Sharad Pawar) मोदींनी हल्लाबोल केला.
काय म्हणाले पवार?
पंतप्रधान मोदी साहेब बोलतात खूप. एकदा तर त्यांनी सांगितलं की, शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो. पण आज त्यांचे जे काही राजकारण सुरू आहे. ते माझ्या विचारांनी नाही. माझं बोट धरल्यावर मी असलं काम करू देणार नाही. मोदी सरकारने आखलेली धोरणे हीताची नाहीत.
धुळे : माजी आमदार अनिल गोटे यांची अजित पवार गटावर टोलेबाजी
व्यापाऱ्यांची मी नियोजित केलेली बैठक याआधी महाराष्ट्रात कधीही रद्द झाली नव्हती. मात्र यावेळी ती रद्द झाली, कारण एकप्रकारचा दबाव टाकला जात आहे. दबावानं समाजकारण, राजकारण करता येत नाही.
आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात? आजचे प्रधानमंत्री कर बसवतात, वसूल करतात. त्या वसुलीतून १०० रुपये आले तर त्यातले ६ रुपये खिशात टाकतात आणि सांगतात तुमच्या खिशात मी पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही गॅरंटी कशी? वसूल करायचे १०० आणि ६ परत द्यायचे. १०० वसूल करायची गॅरंटी… pic.twitter.com/Rfx92o1rlK
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 22, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर लावून जनतेकडून १०० रुपये वसूल करतात आणि मग त्यातलेच सहा रुपये आपल्या खिशात टाकून म्हणतात मी तुम्हाला पैसे दिले. ही आहे मोदी गॅरंटी म्हणत, पवारांनी मोदींनी टोमणा हाणला.
लोकसभा आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा….
सामान्य लोकांचे हित नाही, तिथे बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. म्हणून निवडणूकीत बटण दाबलं पाहिजे. आता यावेळेची खूण ही वेगळी आहे. घड्याळ्याची खूण ही तुम्हाला पाठ होती. आमचा पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच चोरी झाली. बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. सगळेच्या सगळे सोडून गेले. आता आम्ही नवा पक्ष, नवी खूण, नवा झेंडा, पण तोच जुना कार्यक्रम घेऊन पुढे आलेलो आहोत. असं शरद पवारांनी यावेळी संबोधित केले.
माढ्याच्या जागेसाठी शरद पवारांच्या मनातील उमेदवार कोण?
ज्यावेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी याच तुतारीने त्यांचं स्वागत होतं. आज महाराष्ट्रात झालेल्या बदलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाच्या परिवर्तनाची तुतारी वाजवायची आहे. त्यासाठी ही खूण लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे काम तुम्ही लोकांनी करावं. असं आव्हानही यावेळी पवारांनी मतदारांना केलं.