टीम लय भारी
मुंबई : बेळगाव महापालिका निवडणूक प्रचारासाठी शिवसेना का गेली नाही? असा सवाल एका पत्रकाराने संजय राऊत यांना केला होता. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, आम्ही मुद्दामच प्रचाराला गेलो नाही, कारण या निवडणुकीला वेगळे वळण लागू नये. तसेच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही बेळगावात प्रचारासाठी गेलो नाही (ShivSena did not go for Belgaum Municipal Corporation election campaign).
बेळगाव महानगर पालिकेत भाजपचा विजय झाला असून महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपला ३५ जागा, काँग्रेसला १०, अपक्ष ८, महाराष्ट्र एकीकरण समिती ४ आणि एम आय एमला १ जागा मिळाल्या आहेत (BJP’s victory in Belgaum Municipal Corporation).
Sanjay Raut : तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा
MNS questions to Sanjay Raut : अग्रलेख लिहिण्यापलीकडे काय केलंत? मनसेचा संजय राऊतांना सवाल
यावेळी राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला. बेळगाव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी शेकडो मराठी माणसे मेली, त्याचबरोबर बाळासाहेबांना तुरुंगात जावे लागले. आणि मराठी माणूस हरला म्हणून तुम्ही पेढे वाटतात, तुम्हाला लाज वाटत नाही असे राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
“Why Do You Hate Nehru So Much”: Shiv Sena’s Sanjay Raut Asks Centre