लय भारी टीम
मुंबई : कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी राज्य सरकारकडून आणखी एक महत्वपूर्ण निर्णय (Corona Effect) घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल ११ हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. तशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ७ वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११ हजार आरोपी किंवा गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी, अशाही सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.