टीम लय भारी
नाशिक : काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोचे भाव कमी झाले आहेत. तसेच या पिकाबाबत कोणतीही सरकारी योजना लागू होत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. याबाबत IAS अधिकारी विवेक अगरवाल यांनी प्रशासनाला पत्र लिहिले आहे(Tomato prices have come down in the market. Also, as no government scheme is being implemented for this crop).
टोमॅटो पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्याने भाव मात्र उतरले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री खासदार भारती पवार यांनी केंदीय मंत्री पियुष गोयल व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी संपर्क साधला आहे.
IAS होण्यापेक्षा आयुष्य अनमोल आहे, सनदी अधिकाऱ्यांनी तरूणांना सांगितला मंत्र
शेतकऱ्याला दोन एकर गांजा पिकवायचा आहे, सरकारकडे मागितली परवानगी
यावर मंत्रिमंडळाने उत्तर दिले आहे. टोमॅटो पिकावर कोणत्याही प्रकारचा निर्यात कर नसल्याचे सांगत गरज पडल्यास सरकारी योजनेअंतर्गत केंद्र सरकार ५० टक्के तोटा सहन करण्यास तयार असल्याचे ट्विट भारती पवार यांनी केले आहे.
मात्र विवेक अगरवाल यांनी लिहिलेल्या पात्रात असे म्हंटले आहे की टोमॅटो आणि बटाटा हे नाशिवंत पीक असल्याने त्यावर किमान आधार किंमत (MSP) लहू होत नाही. परंतु मार्केट इन्व्हेन्शन स्कीम नुसार ५० टक्के तोटा सहन करायला सरकार तयार आहे. असे पत्राद्वारे विवेक अगरवाल यांनी कळवले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिक मध्ये टोमॅटो चे भाव कोसळले असताना राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून मविआ सरकार फायटर असल्यासारखं राज्यामध्ये काम करत आहे ही बाब अतिशय निंदनीय आहे.
सध्याची टोमॅटोची आवक बघता मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकाचे उत्पादन झाले असून pic.twitter.com/YUwred5VPb— Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) August 27, 2021
एका शिवसैनिकाचे बोचरे व्यंगचित्र, भाजप – नारायण राणेंवर निशाणा !
Salary of IAS Officer: Here’s how much IAS Officer earns in salary after clearing UPSC Exam
आपापल्या राज्यात ज्या भागात या योजनेची गरज असेल तेथील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या पत्रातून अधिकाऱ्यांनी केले आहे.