टीम लय भारी
मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कौतुकाची स्तुतीसुमने उधळली आहेत. भुजबळांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले. असे विधान पाटील यांनी केले आहे (Jayant Patil showered praises on Chhagan Bhujbal).
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम झाले आहे. त्याचबरोबर भुजबळसाहेबांच्या कल्पकतेमुळेच ओबीसींचे आरक्षण वाचवण्यात यश आल्याचे पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा घेतला समाचार
मंत्री जयंत पाटील यांचा विनम्रपणा, सामान्य लोकांच्या भेटीसाठी विधानभवनातून आले रस्त्यावर !
जयंत पाटील हे सध्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली आहे. पावसामुळे जायकवाडी धरण ओसंडून वाहत आहे. परंतु त्याचा येथील शेतकऱ्यांना उपयोग होत नाही. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशी कैफियत पाटील यांनी मांडली.
Jayant Patil : जयंत पाटील मुंबईवरून इस्लामपुरला परतले, अन् कार्यकर्ते भावनिक झाले
Maha plans Jayakwadi canal repair work, says Jayant Patil
शिवसेना आमदार सुहास कांदेनी भुजबळांवर केली होती टीका
शिवसेना आमदार सुहास कांदेनी पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले होते. छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भुजबळ यांनी घोटाळा केल्याचा आरोप कांदे यांनी केला होता.