टीम लय भारी
मुंबई : ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांविरोधात केंद्रातील भाजप सरकारने ईडीचा ससेमिरा लावला आहे. त्याला प्रत्यूत्तर म्हणून ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील घोटाळे उकरायला सुरूवात केली आहे ( Uddhav Thackeray set up enquiry comittee )
आजच ठाकरे सरकारने मोठा आदेश जारी केला आहे. या आदेशान्वये ‘जलयुक्त शिवार अभियाना’ची खुली चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
‘जलयुक्त शिवार अभियान’ ही देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील मोठी योजना होती. या योजनेवर हजारो कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. परंतु या योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगाने ठाकरे सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची चौकशी करण्याचा आदेश जारी केला आहे.