सध्याचं वाढतं तापमान पाहता गरज नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणं टाळा(protect yourself from the summer) कारण ह्या उन्हळ्यात उष्माघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे ह्या सगळ्यापासून वाचण्यासाठी कश्या पद्धतीत काळजी घ्यावी हे आपण पाहणार आहोत.
सगळ्यात पहिलं उष्माघात म्हणजे काय तर
कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटलं जातं.बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू होऊ शकतो
उष्णाघाटची लक्षणे आपण पाहणार आहोत
चक्कर येणे, उल्ट्या होणं, मळमळ होणे.
शरीराचे तापमान जास्त वाढणे.
पोटात कळ येणे.
शरीरातील पाणी कमी होणे.
लहान मुले , गरोदर स्त्रिया , वयोवृद्ध वैक्तींमध्ये उष्माघात होण्याची शक्यता जास्ते असते
आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.
ORS, लिंबू सरबत, फळांचा रस , ताक आदी पेय यांचे सेवन करा
हलक्या वजनाचे , फिकट रंगाचे कपडे , सुती कपडे वापरा
उन्हात घराबाहेर जाताना गॉगल , छत्री , टोपी , स्कार्फ यांचा वापर करा
हे करू नका
चहा-कॉफी, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ते टाळायला हवेत.
शक्यतो घराबाहेर पडणं टाळा
गडद रंगाचे कपडे वापरणं टाळा