महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी फोडल्यानंतर देशात अजून कुणाचा धोका आपल्याला निर्माण होऊ शकतो असा प्रश्न ज्यावेळी भाजपला पडतो त्यावेळी त्यांच्यासमोर एक पक्ष येतो तो म्हणजे आम आदमी पार्टी. पार्टीचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशात 23 , लोकसभा जागा निवडणूक लढवणार आहे.यामध्ये दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे.
श्रीकाळारामांना तब्बल ३२ हात पांढराशुभ्र फेटा !
जाणून घ्या, कोरफडीमध्ये दडलेलं रहस्य
हाय बीपी आणि लो बीपी नियंत्रित करण्यासाठी दररोज करा ही ५ योगासने
दिल्ली याठिकी आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा योग्य प्रकारे दिलेले आहेत. देशात दिल्लीचा आदर्श घालून दिला आहे.राज्य 7000 कोटी रुपये बजेटमध्ये फायद्यात आहे.हा आदर्श संपूर्ण देशभर सांगणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे अरविंद केजरीवाल होय.की देशभर फिरले तर आपल्याला सुद्धा उत्तर देताना नाकी नऊ येतील अशी भीती भाजपला वाटत आहे म्हणूनच अरविंद केजरीवाल्यांना अटक केले असल्याची टीका आत मधून होत आहे.
या नेत्याना केली अटक
शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया,आरोग्य मंत्री संजय सिंह त्याने मंत्रीपदाची जबाबदारी योग्य सांभाळत या क्षेत्रात भरीव काम केलेला आहे तर आजची मुलुख मैदान तोफ संजय सिंह यांनी भाजप सरकार कसं भ्रष्टाचारी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.अरविंद केजरीवाल हे देशभर भाजप कसे चुकीचे हे सांगत फिरणार प्रचार करत फिरणार म्हणूनच ही कारवाई केली असल्याचे टीका करत याच नेत्यांना अटक केली असल्याचे सांगितले आहे.
राज्यात नाचक्की
खरंतर राज्यात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून सरकार स्थापन केले आहे. याबाबत जनतेकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचा अहवाल सुद्धा भाजपला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार शिवसेनेच्या अनेक खासदारकीच्या उमेदवारांना तिकीट नाकारले जात असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलं.भ्रष्टाचाराच्या विरोध आपण आहोत ना खाने दूंगा ना खाऊंगा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणत असले तरी भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्यांना सरकारमध्ये सहभागी कसं करून घेतलं असा प्रश्न जनता विचारत आहे.
सुरुवात केली आमदार प्रताप सरनाईक यांनी
‘टॉप्स सिक्युरिटी’ गैरव्यवहार प्रकरणी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीकडून चौकशी सुरू होती . 24 नोव्हेंबर 2020 ला प्रताप सरनाईक यांचं घरं, कार्यालय, हॉटेल्स या विविध ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर पुत्र विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक आणि स्वतः प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीकडून सरनाईक यांच्या विविध मालमत्तेवर छापे टाकले होते.
मग यांना ईडी का नाही
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक मंत्री आणि राजकारणी यांना ईडीच्या चौकशीची नोटीस पाठवली.त्यांची चौकशीही करण्यात आली मात्र ते ज्यावेळी सरकारमध्ये आले त्यावेळी त्यांना निर्दोष कसे काय सोडून दिले असाही प्रश्न जनतेसमोर पडत आहे. ईडीची टांगती तलवार नको म्हणून अनेकजण सत्ताधारी पक्षात सहभागी झालेत. भाजपकडे अधिक नेते गेल्याने आपल्यालाही सत्तेचा काही वाटा मिळेल म्हणून सुद्धा काहीजण भाजपकडे गेलेत.