27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रजयंत पाटील यांनी राज्यपालांना ‘गोंजारत‘ चिमटे काढले!

जयंत पाटील यांनी राज्यपालांना ‘गोंजारत‘ चिमटे काढले!

टीम लय भारी

मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. हे दोन दिवसांचे विशेष आधिवेशन आहे. राष्ट्रवादी काॅंगे्रस पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्तावर मांडला. त्याचवेळी त्यांनी राज्यपलांवर उपरोधक टीका करण्याची संधी सोडली नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडी बाबत वारंवार राज्यपालांना विनंती केली. परंतु त्यांनी आमची विनंती कधीच मान्य केली नाही. ते कशाची वाट पाहत होते. हे आज सर्वांच्या लक्षात आले आहे. हे त्यांनी अधिच सांगितले असते. तर एकनाथरावजींनी यांनी आधीच केले असते. असा खोचक टोला लगावला. राज्यपालांनी ही मागणी आता मान्य केली आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानावेत.

‘महाराष्ट्र आणि देशाला राज्यपाल कसा आदर्श घालू शकतो‘, याचे हे एक उदाहण आहे. या वेळी जयंत पाटील यांनी राज्यपालांना विनंती केली की, आम्ही पाठवलेली विधानपरिषदेची 12 नावांची यादी तात्काळ मान्य करावी. राज्यपालांनी असे केल तर ते सर्वाशी समान वागले असे दाखविण्याची ही शेवटी संधी आहे.

हे सुध्दा वाचा:

दीपक केसरकरांना अरविंद सावंतांकडून प्रत्यूत्तर

उदय सामंत अजूनही उद्धव ठाकरेंबरोबरच!

‘हरि नरके खालच्या जातीतले; म्हणून त्यांच्या शेजारी घर करु नका‘

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी