29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रशंभूराज देसाई म्हणाले, आमचा उठाव दोन वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता

शंभूराज देसाई म्हणाले, आमचा उठाव दोन वर्षांपूर्वीच व्हायला हवा होता

टीम लय भारी

मुंबई : उठाव केलेले आम्ही सगळे आमदार मतदारसंघात जात आहोत. जनतेचा व शिवसैनिकांकडून आमचे जोरदार स्वागत होत आहे. जनता खूष आहे. हे दोन वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते, अशी भावना शिवसैनिक व जनतेकडून व्यक्त होत असल्याचे विधान एकनाथ शिंदे गटातील बंडखोर राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देसाई यांनी हे विधान केले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले की, काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत आमची नैसर्गिक युती होवू शकत नाही. हे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. पण आमचे ऐकले नाही. त्यामुळे 55 पैकी 40 आमदारांनी उठाव केला. विधानसभेतील 75 टक्क्यांपेक्षा जास्त निवडून आलेले लोक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा आम्हालाच मिळेल. उद्धव ठाकरे यांना सुद्धा हे ठाऊक आहे. त्यामुळेच नवे चिन्ह घेण्यासाठी त्यांनी मानसिकता तयार केली असल्याचे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांचे भावाप्रमाणे संबंध आहेत. नरेंद्र मोदी सुद्धा उद्धव ठाकरे यांना धाकट्या भावाप्रमाणे मानतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, व एकनाथ शिंदे यांना आशिर्वाद द्यावेत, अशाही भावना देसाई यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : मुंबई पोलिसांच्या चांगल्या मोहीमेला महापालिकेच्या हप्तेखोरीचा कोलदांडा

शाहजी बापूंचा ‘मुका‘ घ्या ‘मुका‘

VIDEO : LIVE : उद्धव ठाकरे पुन्हा बरसले, बंडखोरांविरोधात दंड थोपटले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी