टीम लय भारी
मुंबई : गेले कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी लालपरीचा संप सुरु आहे. संपकरी कर्मचारी (ST workers) कामावर रुजू झाले तर एसटी महामंडळाने त्यांच्यावर बडतर्फी व अन्य कारवाई करू नये, ज्यांच्या बाबतीत एफआयआर नोंद झाले असतील त्यांनाही नोकरीवरून काढले जाणार नाही, असे पहावे, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाची महामंडळाला सूचना दिली आहे. (ST workers should not be prosecuted, High Court orders)
यावर उद्यापर्यंत भूमिका स्पष्ट करू, असं आश्वासन महामंडळानं दिल्यामुळे गुरूवारी सकाळी 10 वाजता यावर पुन्हा सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे. मात्र संपकरी कामगारांनी तातडीनं कामावर रूजू व्हावं, तुमच्या समस्या सर्वांनी शांतपणे ऐकल्या, आम्ही कधीही तुमच्यावर कारवाईचे आदेश दिलेले नाहीत.
’15 एप्रिलपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे’
त्यामुळे येत्या 15 एप्रिलपर्यंत सर्व कामगारांनी पुन्हा कामावर रूजू व्हावं, अशी सूचना हायकोर्टानं आंदोलन करणाऱ्या कामगारांना केली आहे. बुधवारी सकाळी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.मात्र तुम्ही आता अधिक ताणून न धरता सर्वांनी तातडीनं कामावर रूजू व्हावं, कुणाचीही नोकरी हिरावून घेतली जाणार नाही, असे दिलासादायक आश्वासन न्यायालयाने दिले आहे.
हे सुद्धा वाचा :
एसटी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरलेल्या सदाभाऊ खोत आणि पडळकरांना अटक
परिवहन मंत्र्यांनी खडसावले एसटी कर्मचारी कामावर परतले नाहीत तर…
IAS राजेश देशमुख यांचा दणका, राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाईची कुऱ्हाड