टीम लय भारी
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर राहतात त लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नाहीत, त्यांच्याासाठी लोक ट्रेन सुरु कराव्यात. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारकडे केली आहे.
मोदी सरकारनी मुंबईत ट्रेन काही प्रमाणात अत्यावश्यक सेवेंसाठी सुरु करायला हव्यात. रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर वर राहतात त्या शिवाय कामावर रुजू होऊ शकत नाही आणि त्या मुळे रुग्ण सेवा व्यवस्थित होत नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 4, 2020
मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्यात. “रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर राहतात ते लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नाहीत, त्यामुळे रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यांच्यासाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्या”, अशी मागणी आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केली आहे.