टीम लय भारी
मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यामागे भाजपचा हात आहे. हे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केले. ही एक ‘सस्पेन्स‘ फिल्म आहे. अजून अनेक गोष्टी सांगायच्या बाकी आहेत, असे सांगून त्यांनी या फिल्मची उत्सुकता ताणून धरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विशेष म्हणजे गृहमंत्री अमित शहांनी खांदयाला खांदा लावून काम केले. अमित शहा या प्रवासात पत्थरासारखे खंबीरपणे आमच्या मागे उभे होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आम्हाला या कामात आशिर्वाद होता. अजून या प्रवासातील कथा बाकी आहे. हे सरकार अडीच वर्ष चालेल. आगामी निवडणुकीत आमचेच सरकार पुन्हा निवडणून येईल. ही एक सप्सेन्स फिल्म आहे. मी दोन महिन्यांपासून नजर ठेवून होतो. केवळ वेळेची वाट पाहत होतो असेही, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही जे काही आहोत. जे काही यश मिळाले ते केवळ मोदी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांमुळे मिळाले आहे. काही काळा करता आम्ही अनपेक्षीत धक्का दिला. नागपूरमध्ये देखील उत्साह ओसंडून वाहत आहे. आमचं सरकार हे रिक्षावाल्याचे सरकार आहे. काॅंग्रेस पक्षाने मोदींना चहावाला म्हणून हिणवलं होतं. त्या ‘चहावाल्यांनी पाणी‘ पाजलं. जर आम्ही रिक्षावाले असू, पानटपरीवाले असू, चहा टपरीवाले, रस्त्यावरचे विक्रेत असून तर आम्हाला अभिमान आहे. मोदींच्या काळात सामान्य माणूस राज्य करणार आहे.
हे सुध्दा वाचा:
शहाजी बापूंनी ‘होयची मान डोलवली‘ – हरि नरके