33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईपूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी...

पूर नियंत्रणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी : जयंत पाटील

टीम लय भारी

मुंबई : आगामी पावसाळ्यात पूराचे नियोजन करताना महसूल, पोलीस , जलसंपदा यांसह सर्वच विभागांनी यांनी परस्पर समन्वय ठेवावा, नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री (Jayant Patil) जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. (Jayant Patil said take care that the citizens in rainy season)

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पूर नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यांच्या समस्या (Jayant Patil) जाणून घेतल्या. यावेळी सचिव विलास राजपूत, सहसचिव तथा मुख्य अभियंता अतुल कपोले, आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, धरणाच्या जलाशयात येणारे पाणी आणि केला जाणारा विसर्ग यावर सातत्याने लक्ष ठेवून राहायला हवे. धरणातून पाणी किती सोडण्यात येणार आहे याबाबतची माहिती सतत विविध विभागांना द्यायला हवी. कमी कालावधीत जास्त पाऊस झाला आणि अचानक पणे धरणातून जास्त पाणी सोडण्याची आवश्यकता (Jayant Patil) भासल्यास त्याची पुरेशी माहिती दिली जावी.

पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचे नियोजन करुन ठेवायला हवे.
वारंवार पूर येणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ज्या जिल्ह्यात आंतर राज्य मुद्दे आहेत तिथे त्या त्या राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री (Jayant Patil) जयंत पाटील यांनी दिल्या.

विदर्भात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात पूर येतो. हा पूर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पर्याय अंमलात आणावे, नदीनाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करावे, शेजारच्या राज्यांशी संपर्कात राहून तिथल्या धरणाच्या पाण्याच्या नियोजनावर लक्ष ठेवावे अशा महत्त्वपूर्ण (Jayant Patil) सूचना जयंत पाटील यांनी दिल्या.

हे सुद्धा वाचा :- 

Monsoon clouds of discord over Almatti: Maharashtra gears up to discuss flash floods with Karnataka

दापोलीचे रिसॉर्ट परबांच्या मालकिचे, सोमय्यांनी सादर केले पुरावे

भारतीय रेल्वेने ऑनलाईन पद्धतीने आरक्षण केल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या वाढवली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी