IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ने हार्दिक पांड्याला आपल्या टीमचा कर्णधार बनवला आहे. रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधारच्या भूमिकेत पाहून चाहते खूप नाराज आहेत. इतकंच नाही तर पहिल्याच मॅचमध्ये हार्दिकने रोहित शर्माला कॅप्टन म्हणून सूचनाही दिल्या होत्या. (IPL 2024 Hardik Pandya Rohit Sharma MI Captaincy Row Navjot Singh Sidhu made a big statement) हार्दिक रागामध्ये रोहितला सूचना देत होता, हे पाहून चाहते खूप निराश झाले. त्याचवेळी माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी हार्दिक आणि रोहितबाबत आपले मत मांडले आहे.
IPL 2024चा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने T20 क्रिकेटला घेऊन दिलं मोठं विधान
नवज्योतसिंग सिद्धू यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना आपले मत व्यक्त केले आणि ते म्हणाले की, “मी अशा भारतीय संघात खेळलो आहे जिथे पाच कर्णधारांना एकत्र पैसे दिले गेले होते, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर, कृष्णमाचारी श्रीकांत आणि रवी शास्त्री.. एक वीट उचला. आणि तुम्हाला त्याच्या वर आणि खाली एक कर्णधार मिळेल.. काही अडचण नव्हती कारण तो आपल्या देशासाठी खेळत होता. त्यांच्यात देशासाठी खेळण्याची प्रेरणा होती. त्यामुळे रोहित हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळून लहान नाही होणार.”(IPL 2024 Hardik Pandya Rohit Sharma MI Captaincy Row Navjot Singh Sidhu made a big statement)
Navjot Singh Sidhu on Rohit Sharma. ⭐pic.twitter.com/OtQNhwitBh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2024
आपला मुद्दा पुढे नेत, माजी भारतीय सलामीवीर म्हणाला, “मी गॅरंटी देतो की यामुळे रोहित शर्मा लहान होणार नाही, तो एक मोठा खेळाडू आहे. ही एक फ्रँचायझी आहे ज्याने एक नवीन माणूस आणला आहे जो अधिक चांगला आहे आणि सर्वांनी त्याला स्वीकारले आहे. सहमत आहे, पण रोहित उत्तम खेळाडू आहे. सिद्धू आपल्या काव्यात्मक शैलीत म्हणाले की, ‘एक बटू पर्वताच्या शिखरावर उभा राहिला तरीही बटू असतो, देव विहिरीच्या खोलवर उभा राहिला तरी तो देव असतो.”
विराट कोहलीच्या नावांवर नोंदवला गेला ‘हा’ खास विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
सिद्धू पुढे म्हणाले की, “लोखंड गरम होते, ते धुमसते आणि नंतर दुधारी तलवार बनते.” यासोबतच ते म्हणाले की, ” सोना गरम होऊन विरघळतो, त्या नंतरच तो हिऱ्याच्या गळ्यातला हार बनतो.” सिद्धू इथेच थांबला नाही, तो म्हणाला – ‘लाखो वादळांचा सामना केल्यानंतर, कोणीतरी रोहित आणि धोनीसारखा नेता बनतो. .कोणताही पुरावा द्यायची गरज नाही. सूर्य काही पुरावा देत नाही, त्याची चमक हा त्याचा पुरावा असतो.”
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहित 10 वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून खेळत आहे. आता मुंबईचा पुढचा सामना 27 मार्चला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.