30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयनाना पटोले यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडले : आशिष देशमुख

नाना पटोले यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडले : आशिष देशमुख

काँग्रेसमधून निलंबित होताच आशिष देशमुख यांनी बॉम्ब टाकला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीने चौकशी केल्यावर आशीष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले.

या कारवाईनंतरआशीष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला “नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. म्हणून नाना पटोलेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यायला पाहिजे होती,असे देशमुख यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा 
रमजान महिन्यात मुंबईतील मुस्लीम वस्तीत दुषित पाणीपूरवठा

शिंदे सेनेचे कार्यकर्ते विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना

रॅपर उमेश खाडेची सुटका करा; जितेंद्र आव्हाड यांची मागणी

ते म्हणाले, मी सातत्याने काँग्रेस पक्षाच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हिताची गोष्ट कोण करत असेल, तर त्याला नोटीस देणे चुकीचे आहे. बजावण्यात आलेल्या नोटीसीला वेळेपूर्वीच शिस्तपालन समितीला उत्तर पाठवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी