टीम लय भारी
मुंबई : पैसा आणि सत्तेचा गैरवापर करीत विविध राज्यातील सरकारे पाडण्याचे पातक भाजप करीत आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भर पावसात आज जोरदार निदर्शने केली ( Congress agitated against BJP ) .
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राजभवन येथे ही निदर्शने करण्यात आली ( Congress agitation at Rajbhavan ). यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
राजस्थानमध्ये लोकशाहीच्या हत्या करण्यात आल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब थोरात यांनी केला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा गैरवापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडून लोकशाहीची हत्या करणा-या केंद्रातील भाजप सरकारविरोधात आज मुंबई येथील राजभवनावर आंदोलन केले.@INCMaharashtra @INCIndia @RahulGandhi @kcvenugopalmp @AshokChavanINC pic.twitter.com/2dUBgAJCgp
— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 27, 2020
लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे लढा उभारण्याची वेळ आली आहे. राजस्थानमध्ये भाजप जे घडवू पहात आहे ते दुर्देवी आहे. लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजस्थानच्या राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलवले पाहिजे.#SpeakUpForDemocracy pic.twitter.com/iLhXSM1Nwk
— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 26, 2020