टीम लय भारी
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवारांनी मला फोन केला आणि मला असं वाटतं ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. असंही ते म्हणाले. बाळासाहेबांना वंदन करून आणि त्यांचं स्मरण करून व वास्तुबद्दल माहिती देत, या वास्तुत अनेक लढे शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात झाले.(Sanjay Raut exposes scams of Devendra Fadnavis and Kirit Somaiya)
शिवाय या वास्तुने अनेक हल्ले देखील पचवले आहेत. अतिरेक्यांचा हल्लाही पचवला. याच वास्तुच्या खाली अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केले आहेत. ज्यांनी वर्षांनुवर्ष ज्यांनी शिवसेनाप्रमुख यांच्यासोबत काम केलं ते सर्व आहेत. थोड्यावेळापूर्वी मला शरद पवारांचा फोन होता. महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांचे फोन सुरू आहेत. सर्वांनी पत्रकार परिषदेला आशीर्वाद दिले आहेत. आप आगे बढो, पुढे व्हा, लढाईची सुरुवात तुम्ही करा, असं त्यांनी सांगितलं, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘मुलुंडचा दलाल’, ज्याला भडवा मराठीत म्हणतात. असा उल्लेख केला आहे. सोमय्या ठाकरे सरकारवर आरोप करतो की, ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात 19 बंगले आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे असागी दावा त्यांनी केला आहे. माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे. कधीही सांगा आपण चार बस करु आणि आपण त्या 19 बंगल्यात पिकनिकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले तिथं दिसले, तर मी राजकारण सोडेन. आणि नाही दिसले, तर त्या दलालाला जोड्यानं मारेन. खोटेपणाचा कळस या दलाललाने पार केला आहे, असा किरीट सोमय्याला टोला लगावला आहे.
मुंबईत मराठी भाषा शाळेत सक्तीची नको, असं म्हणाला होता. तो आज भाजपचा फ्रंटमॅन झाला आहे. हे लोक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भाषा करत आहे. मराठी भाषेच्या विरुद्ध हा भडवा कोर्टात गेला. याचं थोबाड आधी बंद करा नाहीतर आम्ही करू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. सोबतच देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्यांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला असून, पीमसी बॅंकेचा घोटाळ्याचा आरोप हे माझ्यावर करतात, पण खरा घोटाळा तर ही लोकं करतात.
फडणवीसच्या काळात महा आईटी घोटाळा पाच हजार कोटीं कोटींचा घोटाळा तर यांचा सुरू आहे.निकॅान इन्फ्रास्टक्चर नील कंपनी चे मालक देखील किरीट सोमय्या आहेच, त्यांच्यासोबत राकेश वाधवान देखील पार्टनरशीपमध्ये आहेत.ईडीची चिंधीगिरी देखील राऊतांनी चव्हाट्यावर आणली. घरच्या मुलीच्या लग्नात मेंहदी वाल्यापासून ते कपडे शिवणाऱ्यापर्यंत काय आणि किती खर्च झाला हे सुद्धा ईडी वाले पहायला गेले. संजय राऊत म्हणाले एका बीजीपी च्या नेत्याच्या मुलीच्या लग्नात ९ कोटी खर्च झाला ते पण एका कार्पेट मध्ये आम्ही कधी समोर आणले नाहीत. साध्या 80 वर्षाच्या वृद्ध माणसाला ही लोकं 14-14 तास डांबून ठेवतात, तर यांची अशी पद्धत खूप खालच्या थराची आणि अक्षरश: उरमट आहे.
हे सुद्धा वाचा
दिल्लीच्या राजकारणापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही : संजय राऊत
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष
संजय राऊत यांचे धक्कादायक वक्तव्य, आता तुम्हाला आम्ही बरबाद करू