टीम लय भारी
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी चालत जाऊन शिवनेरी किल्ला सर केल्याबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे ( Chhatrapati Sambhajiraje applauded to Governor Bhagat Singh Koshyari ).
प्रत्येक मंत्र्यांनी एक किल्ला दत्तक घ्यावा या राज्यपालांच्या आवाहनाचेही संभाजीराजेंनी समर्थन केले आहे. पण मंत्रीमंडळाची दरवर्षी एक तरी बैठक रायगडावर घेण्यात यावी अशी मी मागणी करत आलो आहे. त्या अनुषंगाने राज्यपालांनी सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती संभाजीराजे यांनी केली आहे ( Chhatrapati Sambhajiraje said, government should organize a cabinet meeting at Raigad )
हे सुद्धा वाचा
अजित पवारांना राज्यपालांनी मारली कोपरखळी
अशोक चव्हाणांच्या राज्यपाल भेटीने उलटसूलट चर्चा सुरू
राज्यपालांनी इटूकल्या पिटूकल्या बिबट्यांच्या पिलांची घेतली भेट
Sharad Pawar : शरद पवारांच्या राज्यपाल भेटीमध्ये विधानपरिषदेच्या 12 जागांबाबत चर्चा
शिवाजी महाराजांनी ज्या ध्येयवादाने राज्यभिषेक केला होता, तो हेतू राज्यकर्ते व अधिकाऱ्यांच्या ध्यानी येण्यासाठी रायगडावर मंत्रीमंडळाची एक बैठक व्हायला हवी. स्वराज्याचे सुराज्यात कसे रूपांतर करावे याची प्रेरणा राज्यकर्त्यांना मिळेल, असेही संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी 'पायी' सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो. pic.twitter.com/76hkxSAlPp
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 16, 2020
राज्यपालांचा शिवसेनेला टोला
शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून अनेकजण मिरवतात. परंतु त्यांचे कार्य आत्मसात करीत नाहीत, अशा शब्दांत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे ( Governor Bhagat singh Koshyari slams to Shivsena ).
शिवनेरी किल्ला सर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांना शिवनेरी किल्ल्यावर नेता यावे म्हणून प्रशासनाने खास पालखीचे आयोजन केले होते ( Governor Bhagat Singh Koshyari vistis Shivneri ). परंतु त्यांनी पालखीची मदत घेतली नाही. तब्बल ५० मिनिटे पायी चालून त्यांनी शिवनेरी किल्ला सर केला. प्रत्येक मंत्र्यांनी एक किल्ला दत्तक घ्यायला हवा, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.