26 नोव्हेंबर 2008 च्या संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे मुंबईकर वावरत होते. पण जसजशी रात्र वाढत गेली तसे मुंबई हादरली. पाकिस्तानमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 हून अधिक जण जखमी झाले होते. मुंबईत घुसलेल्या या दहशतवाद्यांनी फक्त सामान्य नागरिकांवर नाही तर कायद्याच्या रक्षकांवरही गोळ्या चालवल्या. या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलीस शहीद झाले, तर काहीजण जायबंदी झाले. या दहशतवादी हल्ल्याला या वर्षी 14 वर्षे पूर्ण झाले आहेत, परंतु या हल्याच्या जखमा अजुन ही ताज्या आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात प्राणपणाने लढणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी अरुण जाधव यांच्याशी ‘लय भारी’ने साधलेला संवाद.
VIDEO : २६ / ११ : मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या तोंडून ऐका चित्तथरारक कहाणी !
26 नोव्हेंबर 2008 च्या संध्याकाळपर्यंत नेहमीप्रमाणे मुंबईकर वावरत होते. पण जसजशी रात्र वाढत गेली तसे मुंबई हादरली. पाकिस्तानमधून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता.