लय भारी न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राला यशस्वी मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार व अन्य सगळेच मुख्यमंत्री कष्टाळू होते. परंतु विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये क्षमता नाही. त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होईल, असा आरोप भाजपचे नेते व खासदार नारायण राणे यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे हयात असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होता आले नसते. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांनी बाळासाहेबांच्या विचारांसी बेईमानी केली. महाविकास आघाडी आकारास येत असताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत हे तिघेजण शरद पवारांना जाऊन भेटले. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव तुम्ही जाहीर करा. तसे केले तर तुम्ही म्हणाल ते ऐकू, अशी या तिघांनी शरद पवारांना गळ घातली. त्यामुळे पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर केल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचीही फसवणूक केल्याचा राणे यांनी आरोप केला.
उद्धव ठाकरे यांच्यात क्षमत नाही. महाराष्ट्रासाठी धमक असलेला मुख्यमंत्री आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार नाही.
हे सुद्धा वाचा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ७८ हजार कोटींची गरज : नारायण राणेंनी सांगितला खर्चाचा आकडा