महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नमाज सुरू असताना मशिदीबाहेर संगीत (DJ) वाजवण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत किमान चार जण जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिसरात शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे मशिदीसमोर डीजे संगीतासह धार्मिक मिरवणूक काढल्यानंतर दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. मंगळवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले असून आतापर्यंत 45 जणांना अटक करण्यात आली आहे.
जळगावहून नाशिक जिल्ह्यातील वणीकडे जाणारी दिंडी मिरवणूक पालधी गावातून जात असताना ही घटना घडली. मशिदीसमोर संगीत वाजवण्यावरून वाद झाला आणि त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले. मुस्लिमांची घरे लुटली गेली आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मात्र पोलिसांनी हे आरोप नाकारले आहेत. सदर माहितीनुसार, या मिरवणुकीत संगीत वाजत होते. मात्र ही मिरवणूक मशिदीच्या परिसरात गेल्यावर संगीत बंद करण्यात आले. तथापि, मिरवणूक मशीद ओलांडल्यानंतर संगीत पुन्हा सुरू झाले तेव्हा या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारात चार जण जखमी झाले असून, सध्याची परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात आहे, अशी माहीत जळगावचे पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली. त्याचप्रमाणे एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती देत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Maharashtra | A clash broke out between two groups over playing music outside a Mosque while Namaz was going on, in Jalgaon district
Two FIRs have been registered, we’ve arrested 45 people so far. 4 people are injured in the violence. The present situation is peaceful and is… pic.twitter.com/EaT5WIOtwT
— ANI (@ANI) March 30, 2023
दुसर्या घटनेत, छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात दोन गटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर काही पोलिस व्हॅन आणि सार्वजनिक वाहने जाळण्यात आली, असे महाराष्ट्र पोलिसांनी गुरुवारी सांगितले, एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार. 29 आणि 30 मार्चच्या मध्यरात्री हाणामारी झाली. छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त (CP) निखिल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाणामारीत दगडफेकही झाली.
दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला, पिंपरी चिंचवड शहरात एका कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दोन गटांमध्ये हाणामारी होण्याची शक्यता होती, त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अटलबिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनासाठी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विद्यमान विरोधी पक्षनेते (LOP) देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होण्यापूर्वीच ही घटना घडली.
हे सुद्धा वाचा :
‘जय श्री राम’ बोलला नाही म्हणून इमामावर प्राणघातक हल्ला!