28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमनोरंजनआता तू मालदिवलाच रहा; चाहत्यांचा सोनाक्षीला चिमटा !

आता तू मालदिवलाच रहा; चाहत्यांचा सोनाक्षीला चिमटा !

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिंदी इंडस्ट्रीत तेरा वर्षांपासून हिट चित्रपट द्यायला धडपडतेय. दबंग सिरीज आणि लुटेरा चित्रपट वगळता सोनाक्षीनं हिट चित्रपट दिलेला नाही. सोनाक्षी केवळ सोशल मीडियातून चर्चेत राहण्याचा अतोनात प्रयत्न करते. आपण नुकतीच मालदीवला चार दिवस पिकनिक करून आल्याचं सोनाक्षीनं इंस्टाग्रामवर पोस्ट केलं. आपली सोलो ट्रीप हिट होईल, यासाठी सोनालीनं मोठा गाजावाजा करण्याचा प्रयत्नही केला. सिनेमा चालत नाहीयेत, तू मालदिवलाच रहा असा चिमटा नेटीझन्सनी काढला.

२०१० साली सलमान खानच्या ‘दबंग’ सिनेमातून सोनाक्षीनं हिंदी सिनेमात पदार्पण केलं. वर्षभराचा ब्रेक राहिल्यानंतर सोनाक्षीनं पुन्हा अजय देवगणसोबत ‘सन ऑफ सरदार’ हा दुसरा सिनेमा केला. रणवीर सिंगसोबत ‘लुटेरा’ सिनेमानं तिचं करियर बहरलं. त्यानंतर सोनाक्षीचे चित्रपट फ्लॉप ठरू लागले. ‘लुटेरा’ नंतर सोनाक्षी दबंग सिरीज वगळता हिट सिनेमे देऊ शकली नाही. २०१९ साली सोनाक्षी आलिया भट, वरुण धवन आणि आदित्य रॉय कपूर सोबत केलेल्या चित्रपटाला ‘कलंक’ लागल्यासारखं प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षी दरम्यानच्या काळात गायबच राहिली. ती बरेचदा आपल्या अफेअर्सबाबत चर्चेत असते. सोनाक्षी सलमान खान आणि अर्पिता खानची निकटवर्तीय समजली जाते. खान कुटुंबीयांच्या कार्यक्रमाला सोनाक्षी आवर्जून उपस्थित असते. त्यावेळी फोटोग्राफर्ससमोर प्रसिद्ध होण्याची एकही संधी सोनाक्षी चुकवत नाही. सोनाक्षीचे पिक्चर्स येतात कधी आणि सिनेमागृहातून जातात कधी याबद्दलही फारशी माहिती नसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

‘कलंक’ दणक्यात आपटल्यानंतर निर्माता करण जोहरनं सोनाक्षीlला आता सहाय्यक अभिनेत्रीचंही काम द्यायचं नाही अशी खूणगाठ बांधली आहे. सोनाक्षीला आता निर्माते सिनेमात काम देण्यास इच्छुक नाही. अशातच इंस्टाग्रामवर जाहिराती करून सोनाक्षी दिवस ढकलतेय. तिनं नुकतंच वांद्रे येथे मोठं आलिशान घर घेतलं. त्यानंतर सोनाक्षीनं चार दिवसांची सोलो ट्रीप करत मालदीवमध्ये धम्माल केल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली.

हे सुद्धा वाचा 
काश्मीरच्या नदीत अंघोळ केलीच आता लग्न कधी करतोयस, चाहत्यांचा कार्तिकला थेट सवाल!
राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मराठी अस्मितेला हात, ठिगळ लावलेली अस्मिता नकोच…
 सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी लाच मागतात; साऊथच्या अभिनेत्याकडून भांडाफोड

सिनेमा नाही तर बॉलिवूड कलाकार मालदिवला फोटोशूट करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूडचा हा अलिखीत ट्रेंड पाळत सोनाक्षी चर्चेत राहण्याचा अतोनात प्रयत्न करतेय.फोटोशूट करून तुला नवा सिनेमा मिळणार का, असा प्रश्न नेटीझन्स सोनाक्षीला विचारताय. सोनाक्षीचं करियर फ्लॉप ठरल्यानं ती मध्यंतरी फारच निराश झाली होती, आता लग्न कर किंवा दुसरं करियर सुरु कर असा सल्ला तिला नेटीझन्सनी दिलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी