लय भारी न्यूज नेटवर्क
पुणे : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल लागला. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, अयोध्या निकाल ऐकायला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते. मी न्यायालयाच्या निर्णयाचे आभार मानतो. असंही राज म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज शनिवारी पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी बोलताना राज यांनी अयोध्याप्रकरणी न्यायालयाचे आभार मानले. तसेच राम राज्य आले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. लोकांचा रोजगार गेला त्यांना रोजगार मिळायला पाहिजे अशीही इच्छा व्यक्त केली.
राज्यातील सत्तास्थापनेवर राज यांची चुप्पी…
राज्यातील सत्तास्थापनेच्या गोंधळावर राज ठाकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यानंतर राज यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. व तेथून निघून गेले.