टीम लय भारी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी नुकतेच सहकुटुंब केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे जाऊन भगवान विष्णूचे दर्शन घेत राज्याला विकासाच्या पथावर व जनतेला सुखसमृद्धी लाभो अशी प्रार्थना केली.या देवदर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मंत्री जयंतराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जयंत पाटील (jayant patil) यांनी ट्विटमध्ये हर हर महादेव! संपूर्ण कुटुंबासह बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्राचीन अशा केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे भगवान विष्णूचे दर्शन घेतले. विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेले असे म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा: