मुंबई (प्रशांत चूयेकर)
केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रात भाजपने पक्षाची फोडाफोडी केली. ईडीचा धाक नको म्हणून जत्ताच्या जत्ता पक्षाचा भाजपला सहकार्य करू लागला. लोकसभेसाठी मदत करतो मात्र माझी आमदारकी सुरक्षित राहिली पाहिजे , यासाठी शब्द मागण्याची तयारी काहीजणांनी सुरू केली आहे. बारामतीत होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्यात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी तसे बोलून दाखवलेला आहे.यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या उमेदवारांना सुद्धा हाच प्रश्न सतावत आहे.
काय तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य होतेय कमी का ? मग हे करा
गतव्याच्या निवडणुकीत विजय शिवतरे यांच्या विरोधात मोठे विधान करत अजित पवार यांनी त्यांना पराभव करण्यासाठी प्रयत्न केले होते. तसा व्हिडिओ सुद्धा महाराष्ट्रात वायरल झाला होता.
आता विरोधकच सोबत असल्यामुळे लोकसभेसाठी एकत्र फिरलो तरी विधानसभेसाठी आम्हाला नेत्यांच्या शब्द मिळणार असेही शिवतारे यांनी सांगितले आहे.
Ambani family-मुकेश अंबानी आणि नीता अंबानी लेकांच्या प्री-वेडींग कार्यक्रमात 90’S मधल्या गाण्यावर डान्स
गतवेळच्या निवडणुकीत शिवसेना भाजपने ,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
येणारी लोकसभा सुद्धा भाजपच्याच कडे असावी यासाठी महाराष्ट्रातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली.शिवसेना भाजप बरोबर आता राष्ट्रवादीची ही सोबत आहे.लोकसभा निवडणुकीलोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत.विधानसभा निवडणुकीत हेच एकमेकांच्या विरोधात उमेदवार असतील.महायुती झाली तर नेमकं कोणाला तिकीट मिळणार अशी संभ्रम अवस्थामहायुती झाली तर नेमकं कोणाला तिकीट मिळणार अशी संभ्रम अवस्था या उमेदवारांच्या उमेदवारांच्या मधून होत आहे.
सध्या राज्यात वादळापूर्वी शांतता दिसत असली तरी लवकरच या वादळाला भाजपला तोंड द्यावे लागणार आहे.यामध्ये नेत्यांची मात्र तारांबळ उडणार हे नक्की.