टीम लय भारी
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रवक्ते गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादवर टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे काही प्रश्न विचारले आहे. त्यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
संभाजीनगर म्हणत बॅनरबाजी करायची. मी म्हणतोय ना संभाजीनगर? म्हणून सभेत घोषणा करायच्या. पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार आहे? या टोमणेसभेच्या दुसऱ्या अंकात आपण पेपर भिरकावणार आहात का की हा बघा केंद्राला प्रस्ताव पाठवला?”
संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का? मागच्या टोमणे सभेप्रमाणे भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरून आली आहे का? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. मनसेच्या या व्हिडिओवर शिवसेने काय प्रतिक्रीया देणार याच्याकडे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा:
काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाबमध्ये दाखल, गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट