टीम लय भारी
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजून न्यायालयात भूमिका मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खळबळ जनक खुलासा केला आहे. या विधानामुळे महाविकास राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकारची चिंता वाढणार आहे. एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं ‘आता नंबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा’ नेत्यांनी संविधानिक वर्तन करावे अशी अपेक्षा केली आहे. सध्या राज्यात या विधानाची मोठ्या प्रमाणात चर्चा होतं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे नेते सध्या जेल मध्ये आहे. या नंतर आता गृहमंत्री (home minister) दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं जातं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी हा महत्त्वाचा पक्ष आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे राज्य सरकारची डोके दुखी निश्चित वाढणार आहे. भाजपचे माजी खासदार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम्ही सगळी प्रकरणे समोर आणू. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.