टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करण्यासाठी मनसेने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. आता त्या नंतर मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर बोट उचलले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे (He has targeted the Thackeray government through Twitter).
मागील अनेक महिन्यांपासून ते राज्य सरकारला निर्बंध शिथिल करण्याचे सांगत आहेत. त्यांनी या गोष्टीत सातत्य कायम ठेवले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असल्यामुळे त्यांनी आता थेट त्यांचा निशाणा मुख्यमंत्र्यांवर साधला आहे.
संजय राऊतांचा शिवसेना भवनावर बोलणाऱ्यांना इशारा; स्वत:च्या पायावर याल, पण जाताना…
भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; असा मिळवला विजय
पहिले एकच म्हण होती, “तळी राखी तो पाणी चाखी” या सरकारच्या काळात अनेक नव्या म्हणींचा जन्म झालाय “शहर राखी तो बिर्याणी चाखी”, “महापालिका राखी तो कमिशन चाखी”, मराठी भाषेला नवीन म्हणी बहाल केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार. “आमचा सीएम जगात भारी.” अशा उपरोधित शब्दात मनसेच्या संदीप देशपांडेनी ट्विट केले आहे (Sandeep Deshpande of MNS has tweeted in such sarcastic words).
पाहिले एकच म्हण होती” तळे राखी तो पाणी चाखी”या सरकारच्या काळात अनेक नव्या म्हणींचा जन्म झालाय”शहर राखी तो बिर्याणी चाखी” “महापालिका राखी तो कमिशन चाखी” सरकार राखी तो वसुली चाखी”मराठी भाषेला नवीन म्हणी बहाल केल्याबद्दल मुख्यमंत्रांचे जाहीर आभार. आमचा सी.एम जगात भारी.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 2, 2021
महाराष्ट्र हळहळला, 16 कोटीच्या इंजेक्शननंतरही चिमुकल्या वेदिकाचा आज पहाटे मृत्यू
Need Permanent Solution To Flood Crisis In Maharashtra: Uddhav Thackeray
सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी मनसेने सरकारला इशारा केला होता. जर लवकरात लवकर लोकल सुरू नाही झाली तर आम्ही आंदोलन करू असे सुध्दा मनसेने सांगितले होते. अद्याप ही लोकल सेवा सर्व नागरिकांसाठी बंदच आहे. लोकल सेवा लवकर सुरू करा अशी मागणी जनते कडून होत आहे. लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी पुन्हा कधी रुळावर येतेय ह्याची सगळे जन वाट पाहत आहेत.