33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयअजब सरकारमध्ये गजब कारभार; 'त्या' निर्णयावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

अजब सरकारमध्ये गजब कारभार; ‘त्या’ निर्णयावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

सरकारमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे काही विशिष्ट लोकप्रतिनिधींनी दबावगट निर्माण केला असून, ते नियमांची अजिबात तमा न बाळगता वाट्टेल त्या कामांबाबत आग्रह धरत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या अजब सरकारमध्ये गजब कारभार सुरू असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचे शेरे (Minister’s Endorsement) अंतिम मानू नये, असे सांगण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात १० जानेवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयावर (government decision) टीका करताना ते बोलत होते. (Ashok Chavan’s criticism of the government decision of the Minister’s Endorsement)

लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या निवेदनावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचे शेरे अंतिम मानू नयेत, हा शासन निर्णय म्हणजे राज्य सरकारने स्वतःच मंत्रिमंडळाच्या विचार व निर्णयक्षमतेवर उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह आहे. हा शासन निर्णय हास्यास्पद, केविलवाणा व तेवढाच चिंताजनक आहे. या शासन निर्णयाने राज्य सरकारच्या तथाकथित सुशासनाच्या दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली असून, सरकारने स्वतःच स्वतःची केलेली अप्रतिष्ठा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांचे शेरे अंतिम मानू नयेत, असा लेखी आदेश खुद्द सरकारने प्रशासनाला देणे म्हणजे अराजकाला निमंत्रण देण्यासारखेच आहे, असे देखील अशोक चव्हाण म्हणाले.

लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून त्यांच्या पत्रांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्रिमंडळातील सदस्यांकडून दिले जातात. शासकीय कामकाजाबाबतचे प्रस्ताव, मंजुरी आदेशांचे आदानप्रदान चक्क व्हॉट्सअॅप व फोनवरूनच केले जाते, अशीही चर्चा होती. या सर्व चर्चेवर सदर शासन निर्णयामुळे जणू मोहर लागली असून, तसे नसते तर हा शासन निर्णय काढावाच लागला नसता, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेद्वारी अर्ज; देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीचा परिनाम?

विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख भाजपच्या वाटेवर? लातूरच्या राजकारणातील सस्पेंस वाढला!

मुख्यमंत्री, मंत्र्यांचे ‘शेरे’ ठरणार कुचकामी, सरकारचा नवा आदेश !

मुळात निवेदने, पत्रांवर शेरे लिहिताना मंत्र्यांनी पुरेशी दक्षता बाळगणे अपेक्षित आहे. पत्रातील मजकूर योग्य असेल तरच त्यावर निर्णायक स्वरूपाचा शेरा दिला पाहिजे. एखादी मागणी नियमात बसते की नाही, याबाबत साशंकता असल्यास संबंधित निवेदनावर ‘तपासून नियमानुसार कार्यवाही करणे’ असा शेरा दिला जाऊ शकतो. या पद्धतीने मंत्र्यांचाही सन्मान राखला जातो व प्रशासनावरही नियमबाह्य, अयोग्य कामांसाठी दबाव निर्माण होत नाही. मात्र या अजब सरकारचा गजब कारभार असल्याने असा शासन निर्णय काढण्याची वेळ आल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी