31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयजयंत पाटील म्हणाले, आता सगळ्यांनीच मान्य केलयं, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच!

जयंत पाटील म्हणाले, आता सगळ्यांनीच मान्य केलयं, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच!

राज्यात महाविकास आघाडीची वज्रमुठ असली तरी, प्रत्येकालाच पक्ष विस्तार करायचा आहे, त्यामुळे तीनही पक्ष आपली ताकद वाढवत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस तर आता मुख्यमंत्रीपदच मिळविण्याची रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी एकसंध रहावी यासाठी उद्धव ठाकरेंनी देखील मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देऊ असा शब्द शरद पवारांना दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. त्यातच शनिवारी कराड येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी नाटकाचा प्रयोग आज कराडमध्ये होत आहे. तो प्रयोग पाहण्यासाठी जयंत पाटील कराडला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्याचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे आता सर्वांनीच मान्य केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आणण्यात येईल असे, पाटील म्हणाले.

काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे इस्लामपूरात एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करु शकतात, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर माध्यमांमध्ये चर्चांना उधाण आले होते. अजित पवार यांनी देखील सकाळ माध्यम समुहाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आता सुध्दा मुख्यमंत्री होण्यास तयार असल्याचे विधान केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण या चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र शरद पवार यांच्या भूमिकेलाच महत्त्व असणार हे देखील राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रियांका गांधी पंतप्रधान मोदींवर उखडल्या; ज्याला लेकींची काळजी नाही तो देशाची काय काळजी करणार?

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचाच जलवा; चारही बाजार समित्यांमध्ये वर्चस्व

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 50 जण ढिगाऱ्याखाली; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

अमोल कोल्हे यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले असता, पाटील म्हणाले की, अजित पवार, मी आणि राष्ट्रवादीचे सर्वच नेते पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. अमोल कोल्हे यांनी कार्यक्रमात माझे, माझ्या मुलाचे कौतुक केले त्यापलीकडे त्यांच्या काही वेगळ्या भावना नव्हत्या. आमची सगळ्याची भूमिका ही पक्ष वाढविण्याची आहे. पक्ष वाढल्याशिवाय केवळ स्वप्ने पाहण्यात काहीच अर्थ नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. 2024 मध्ये राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी