टीम लय भारी
वर्धा : राष्ट्रवादीचे आमदार राजू तिमांडे वर्धा येथील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाले, मला राष्ट्रवादीतून बाहेर काढले पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करताना मात्र त्यांनी शरद पवारांचे गुणगान गायले(NCP MLA Raju Timande addressed Supriya Sule at a function in Wardha and said, “I should be expelled from the NCP”).
त्याचबरोबर राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा आगपाखड केली. मुख्यमंत्र्यांच्या रोज नव्या बैठका होतात परंतु बांधावरच्या शेतकऱ्याच्या मात्र मुख्यमंत्री दृष्टीस पडत नाही. शरद पवार मुख्यमंत्री असताना ते आम्हाला भेट द्यायचे. त्यामुळे शरद पवार जोपर्यंत आहेत तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादीशी प्रामाणिक आहोत.
‘मविआ च्या सर्व आमदारांनी ईडी, सीबीआय कार्यालयात जावे’
तिचा बाप कोण? रोख ठोक उत्तर द्या : नितेश राणे
![NCP](https://laybhari.in/wp-content/uploads/2021/08/2.jpg)
औरंगाबादच्या सभेत सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या शरद पवारांनी जीवाचं पाणी केले त्यामुळे आज राष्ट्रवादी उभा आहे, मग राष्ट्रवादीचे भविष्य काय आहे असा सवाल आमदार राजू तिमांडेंनी सुप्रिया सुळेंना केला.
राष्ट्रीय क्रीडा दिनी पॅरालिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या चंदेरी गर्लची कहाणी
प्रकाश गजभिये राजू तिमांडेना म्हणाले, तुम्ही इतकी गडबड करता तर तुम्हाला आता राष्ट्रवादीतून बाहेर काढले पाहिजे. त्याला उत्तर राजू तिमांडे यांनी या सभेतून उत्तर दिले, म्हणाले मला काढायलाच हवे परंतु जाताना मी शरद पवारांचा निरोप घेईन.