टीम लय भारी
मुंबई : येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होत आहे. १५ जूनपासून NDRF च्या नऊ तुकड्या महाराष्ट्रातील जिल्ह्यात तैनात करण्यात येत आहेत. पावसाळ्यात दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झालंय. तातडीने बचावकार्य करण्यासाठी या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. (NDRF Nine units will arrive in Maharashtra from June 15 in each district)
नऊ पथकांपैकी प्रत्येकी दोन पथके मुंबई आणि ठाण्यात तैनात असतील आणि प्रत्येकी एक पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तैनात असेल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिली. त्याचप्रमाणे, 15 जून ते 15 सप्टेंबर दरम्यान SDRF ची प्रत्येकी एक टीम नांदेड आणि गडचिरोली येथे तैनात केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गेल्यावर्षी आलेल्या पुरामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.याच अनुषंगाने या उद्भवलेल्या घटनेतून धडा घेत १५ जूनपासून NDRF च्या नऊ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.जिल्हाप्रशासन बचावकार्यासाठी सज्ज झाले आहे.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. कोकण भागात प्रत्येक जिल्ह्यात NDRF ची टीम दाखल होणार आहे.त्याच अनुषंगाने आणि पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी NDRF ची टीम जिल्ह्यात आली आहे.
Union Home Min today took a review meeting with all agencies on flood preparedness in view of the onset of monsoon. NDRF in touch with all state govts, and their requirements come to 67 teams compared to earlier 54 teams last year; 14 teams prepositioned: DG NDRF Atul Karwal pic.twitter.com/c00LA3dl34
— ANI (@ANI) June 2, 2022
प्रामुख्याने चिपळूनमध्ये ही टीम दाखल करण्यात आली आहे. त्याचसोबत कोल्हापूर, रायगड,सातारा,रत्नागिरी,पालघर आणि सिंधुदुर्ग या भागातही NDRF ची टीम दाखल करण्यात आली आहे.
पूरासारखी घटना परत घडू नये याकरीता एनडीआरएफच्या संपूर्ण टीमने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात NDRF ची टीम तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
हे सुद्धा वाचा :
काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा : गोपीचंद पडळकर
शिवसेना, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार; कॉंग्रेस सतरंज्या उचलणार; मनसेचा टोला
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही , उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन