टीम लय भारी
कोल्हापूर: ओबीसी जनमोर्चा, कोल्हापूरच्या वतिने महाराष्ट्र शासनाने मागासवर्ग आयोगाला दिलेल्या चुकीच्या लोकसंख्या आकडेवारी बद्दल टोला लगावला. मुख्यमंत्री यांना निवेदन मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे मार्फत महीलांच्या हस्ते देण्यात आले.(OBC Janamorcha mixes population figures)
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेकडो ओबीसी बंधू भागीणींनी जोरदार निदर्शने केली व जोमात टीकाकारण केले. ओबीसींची चुकीची आकडेवारी देणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो , जातवार जनगणना टाळणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, जातवार जनगणना झालीच पाहीजे,
नाही कुणाच्या बापाचे आरक्षण आमच्या हक्काचे ओबीसी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. अशा जोजोरात घोषणा देत महिलांनी चांगलाच सरकारला टोला लगावला आहे.
या दरम्यान माजी महापौर नंदकुमार वळंजू, मारूतराव कातवरे, उमा बनछोडे, महेश वासूदेव, मेहजबीन शेख, लता लोहार, रूपाली सातार्डेकर, मनिषा झुंजार, अंजली वडगांवकर, आदींसह शेकडो ओबीसींनी आपला सहभाग दर्शवला. भाजपमुळे जो त्रास झाला ते मुंबईकर विसरणार नाही अशी टीका पटोले यांनी केली.
हे सुद्धा वाचा
मेडिकल कोट्यात OBC आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी
केंद्राने OBC जागांना अ-सूचना रद्द करणारा SC आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे
ओबीसींवर फारसा विश्वास नाही : जितेंद्र आव्हाड
Why doesn’t OBC’s decide chief minister in Maharashtra: Jitendra Awhad