टीम लय भारी
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘महाविकास आघाडी सरकार’ विरोधात दंड थोपटले आहेत. पण त्यांच्याच पक्षाचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांनी आघाडी सरकारचे कौतुक केले आहे.‘महाविकास आघाडी सरकार’ चांगले काम करीत आहे. किमान समान कार्यक्रमाच्या अनुषंगाने या सरकारने चांगले काम केले असल्याचे मत देवेंद्र भुयार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.
‘महाविकास आघाडी’तून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला तर तुम्ही काय करणार? असे विचारले असता, मला विश्वासात घेतले तर मी संघटनेसोबत राहणार, असे भुयार म्हणाले.भुयार यांच्या मतदारसंघात राजू शेट्टी यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी भुयार यांना निमंत्रित केलेले नाही. परंतु या कार्यक्रमासाठी मी उपस्थित राहणार असल्याचे भुयार यांनी म्हटले आहे.