टीम लय भारी
मुंबई : टी २० वर्ल्डकप २०२१ च्या स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. येत्या सामन्यांमध्ये पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीत एकमेकांसमोर धडकणार आहेत. मात्र भारतीय संघाचे सुपर १२ फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये निराशेचे वातावरण आहे. त्यात अष्टपैलु खेळाडू हार्दिक पंड्या याच्याकडून हवी तशी कामगिरी झाली नाही (Hardik Pandya’s emotional post for cricket lovers).
भारत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पंड्याने गोलंदाजी देखील केली नव्हती. म्हणून भारताला या सामन्यात एका गोलंदाजाची उणीव भासली होती. टी २० वर्ल्डकपमधील आपल्या निराशाजनक कामगिरीवर हार्दिक पंड्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विराट कोहलीचा आणि टॉसचा ३६ चा आकडा, माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया
This wasn’t how we wanted our World Cup campaign to go. We fell short but we will work twice as hard to repay the faith and support shown to us by our fans. Thank you to everyone who cheered us on at the stadiums and everyone back home 🙏 🇮🇳 pic.twitter.com/n8ZnHhEm6H
— hardik pandya (@hardikpandya7) November 9, 2021
‘ आम्हाला असं वाटलं नव्हतं की, टी २० वर्ल्डकपमधील आव्हान असं संपुष्टात येईल. आम्ही या वेळी कमी पडलो, पण चाहत्यांचा विश्वास आणि समर्थन मिळवण्यासाठी आम्ही दुप्पट मेहनत करू. त्या सर्व लोकांचे आभार ज्यांनी स्टेडियम आणि घरून आमचं समर्थन केलं’. अशा प्रकारचे ट्विट हार्दिक पंड्याने क्रिकेट प्रेमींसाठी केले आहे.
SBI कडून दुचाकी कर्ज ‘SBI Easy Ride’ लाँच, YONO वर मिळणार एवढा कर्ज
T20 World Cup: “Will Work Twice As Hard” To Repay Faith Shown By Fans, Says Hardik Pandya
टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारताने नामिबियाला हरवत आपल्या मोहिमेचा अंत गोड केला आहे. या स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी करत तीन सामन्यांवर आपला विजय मिळवला आहे. मात्र या स्पर्धेनंतर विराट कोहलीने टी २० चे कर्णधार पदही सोडले आहे. आता तो फक्त एक खेळाडू म्हणून टी २० संघात आपले योगदान देणार आहे.