कोकणची भूमी आज अशांत, अस्वस्थ आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील बारसूमध्ये जनरल डायरच्या अवलादी निपाजल्या आहेत. तिथे शिंदे-फडणवीस सरकारची मोगलाई सुरू आहे. कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुटीवर जात आहेत तर आता वातावरण पेटलेले असताना कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशवारीवर निघाले आहेत. तिकडे मॉरिशसमध्ये फडणवीस शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करत आहेत आणि इकडे शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेले, जनतेचे सरकार म्हणविणारे आपल्याच लोकांची डोकी फोडत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे शिंदे-फडणवीस सरकार ऑईल रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांवर बळजबरी करत आहे. स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध करत सरकारविरोधात जनआंदोलन उभारले आहे. सरकारच्या दमनकारी नीतिविरोधात स्थानिक जनता आक्रमक झाली आहे. मात्र, तरीही शिंदे-फडणवीस सरकार हा प्रकल्प रेटण्याच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या बारसूच्या पार्श्वभूमीवर जे काही सुरु आहे, त्याबाबत लय भारीचे संपादक विक्रांत पाटील आणि कार्यकारी संपादक सुधाकर काश्यप यांची सविस्तर चर्चा या व्हिडीओतून पाहू शकता.

हे सुद्धा वाचा :
बारसू रिफायनरी प्रकरण: आंदोलन चिघळलं! पोलिसांची कोकणवासियांना अमानुष मारहाण; पाहा व्हिडिओ
बारसू रिफायनरी प्रकल्प: कोकणात जनआंदोलन पेटणार! वाचा नेमकं प्रकरण
बारसू प्रकल्पाबाबत चर्चेतून मार्ग काढा; शरद पवारांचा उदय सामंतांना सल्ला