टीम लय भारी
दिल्ली:- काल टाटा ग्रुपकडे एअर इंडिया सोपवली. केंद्र सरकारने टाटा समुहाकडूनच ६९ वर्षांपूर्वी ही विमान कंपनी घेतली होती. आता एअर इंडियाच्या ‘महाराजा’ पुन्हा एकदा टाटा समुहाकडेच सोपवण्याची औपचारिकता काल पूर्ण झाली. यावर आता टाटा ग्रुपवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करुन टाटा ग्रुपला शुभेच्छा दिल्या आहेत.( Anand Mahindra congratulates Tata Group for Air India)
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या टेकओव्हरबद्दल टाटा समूह आणि एअर इंडियाचे अभिनंदन केले. महिंद्राने सांगितले की, ब्रँड म्हणून एअर इंडिया हा “राष्ट्राच्या खजिन्याचा एक भाग” आहे आणि टाटा समूहाला “त्याचे जुने वैभव परत मिळवण्याची आवड आणि संसाधने या दोन्ही दृष्टीकोनातून” टाटा समूहाचा यापेक्षा चांगला संरक्षक असू शकत नाही. ”
हे सुद्धा वाचा
एअर इंडिया 27 जानेवारीला टाटा समूहाकडे सुपूर्द करणार
बापरे: ‘टाटा’ची वाहने महागणार; एक जानेवारीपासून नवे दर लागू
Income Tax: करबचत करण्याचे सहा प्रभावी मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर
Air India takeover: Tatas saddled with older aircraft, poor cabin products
“आम्ही महिंद्रा समूहातील टाटा समूह आणि संपूर्ण एअर इंडिया परिवाराचे या मैलाच्या दगडावर अभिनंदन करतो. एअर इंडिया हा एक ब्रँड आहे जो देशाच्या खजिन्याचा एक भाग आहे. जुने वैभव पुनर्संचयित करण्यासाठी उत्कटता आणि संसाधने या दोन्हीच्या दृष्टिकोनातून यापेक्षा चांगला संरक्षक दुसरा कोणी नाही,” महिंद्रा समूहाच्या बॉसने ट्विट केले.
We at @MahindraRise congratulate the @TataCompanies & the whole @airindiain family on this milestone. Air India is a brand that’s part of the nation’s treasure trove. There is no better custodian, from the point of view of both passion & resources to restore its old glory. https://t.co/TEkCSwKeZZ
— anand mahindra (@anandmahindra) January 27, 2022
८ ऑक्टोबर २०२१ राेजी झालेल्या लिलावावेळी एअर इंडिया ( Air India ) ही १८ हजार करोड रुपयांमध्ये टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आली होती. टॅलेस ही कंपनी टाटा समुहाचीच उपकंपनी आहे. एअर इंडियाचे सर्व शेअर टॅलेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हस्तांतरीत करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. एअर इंडियाचा ताबा ‘टॅलेस’कडे देण्याचा करार आता पूर्ण झाला आहे. नवीन कंपनीला आमच्या शुभेच्छा, मला विश्वास आहे की, टाटा समूह पुन्हा एकदा एअर इंडियांच्या पंखांना बळ देईल. देशातील विमान सेवेसाठीही ही नवी सुरुवात ठरेल, असा विश्वास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.