टीम लय भारी
सांगली :- सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कडक निर्बध लावले आहेत. मात्र यामुळे व्यापारी वर्गाला त्यांचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. जर आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या आड आले तर वाद विकोपाला जाईल आणि मिरजेला दंगल काही नवीन नाही असे भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे (BJP Mirza MLA Suresh Khade has made a controversial statement).
कडक निर्बधाला विरोध दर्शवताना भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी हे वक्तव्य केले आहे. कोरोना रोखण्यात जिल्हा प्रशासन, शासन निष्कामी झाले. यावेळी बोलताना शुक्रवारी दुकाने उघडणार असा इशारा दिला आहे. सुरेश खाडे यांनी मिरज शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती.
फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत
गेले अनेक दिवस व्यापारी दुकाने उघडण्याची शासनाला परवानगी मागत आहेत. परंतु लॉकडाऊनमूळे कडक निर्बंध लागू असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. दोन वेळा निर्बंध डावलून दुकाने उघडण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला होता. पण पोलीस व महापालिका पथकाच्या भीतीने दुकाने पुन्हा बंद केली (But the shops were closed again due to fear of police and municipal squad).
नरेंद्र मोदींच्या भेटीला संजय राऊत जाणार
Maharashtra BJP president reaches out to Pankaja Munde
आज आमदार सुरेश खाडे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारी दुकाने उघडण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. जिल्हा प्रशासन राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निष्क्रिय ठरले आहे. शुक्रवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यानंतर कारवाई केली तर मिरजेसाठी दंगल नवीन नाही पुन्हा दंगल घडेल असे संकेत त्यांनी दिले आहे.