मृगा वर्तक : टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्रात आतापर्यंतच सर्वात मोठा भुयारी मार्ग येत्या वर्षात तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भुयारी मार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास एक तासाने कमी होईल. हा मार्ग ठाणे आणि नाशिक तालुक्यातून जमिनीखालून जाईल (Construction of the largest subway in Maharashtra in the coming year).
मुंबईपासून साधारण 120 किलोमीटरवर असलेल्या इगतपुरी येथे हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 60% काम पूर्ण झाले असून याची लांबी डाव्या बाजूला 7.78 किलोमीटर इतकी असून उजव्या बाजूला 7.74 किलोमीटर इतकी आहे. तसेच इमर्जन्सीच्या वेळी पार करण्यासाठी एकूण 26 पॅसेज या मार्गात तयार केलेले आहेत.
पृथ्वीच्या दिशेने येत आहे एक सौरवादळ
धक्कादायक: डॉक्टरांकडून परिचारिकेचा विनयभंग
Maharashtra’s longest tunnel to be ready in a year, will cut Mumbai-Nagpur travel time by 1 hour
या भुयारी मार्गामुळे कसारा घाटातील वाहनांची गर्दी कमी होईल तसेच प्रवासाचा वेळ सुद्धा वाचेल. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ नावाच्या मुंबई नागपूर महामार्गावर एकूण 16 प्रोजेक्ट आहेत, त्यातील या प्रोजेक्टचे नाव ‘पॅकेज 14’ (package14) असे ठेवण्यात आले आहे (The project is named as ‘Package 14’).