36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रयुवा पिढीला नशेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्जविरोधी रणनिती : देवेंद्र फडणवीस

युवा पिढीला नशेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्जविरोधी रणनिती : देवेंद्र फडणवीस

युवा पिढीला (youth) नशेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात येत्या काळात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान (Anti-drug strategy) राबविण्यासाठी व्यापक रणनिती आखण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. नव्या सरकारमध्ये बदल्या व पोस्टिंगसाठी कुणाला भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे पोलिसांनी पारदर्शीक कारभार करावा असे आवाहन देखील यावेळी फडणवीस यांनी केले.राज्याची कायदा सुव्यवस्था आणि गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज पुण्यात बैठक घेण्यात आली यावेळी फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis Said Anti-drug strategy to free the youth from the scourge of addiction)

वाळू आणि दारुची तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, नशा निर्माण करणाऱ्या द्रव्यांबाबत पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका ठेवावी, असे आदेश देखील फ़डणवीस यांनी दिले. तपासावरील देखरेखीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यात यावी, तसेच राज्यात विविध जिल्ह्यातील चांगल्या तपास पद्धतींचा पोलिस दलाने स्वीकार करावा, सागरी सुरक्षेच्या प्रस्तावांना तातडीने गती देण्याचेही निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. राज्यातील उद्योगांना त्रास देणार्‍या संघटित गुन्हेगारीचा बिमोड करावा अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यास अजीबात मागे-पुढे पाहू नका, असे आदेश देखील फडणवीस यांनी यावेळी दिले.

हे सुद्धा वाचा

पुण्याचा शिवराज राक्षे झाला ‘महाराष्ट्र केसरी’

सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांची ब्रिच कॅन्डी रुग्णालयात घेतली भेट

112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा तातडीची मदत!

सोशल मीडियावरुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे त्याच्या वापराकडेदेखील लक्ष ठेवण्याची गरज आहे सोशल मिडियाच्या दुरुपयोगाकडेसुद्धा पोलिस दलाचे बारकाईने लक्ष असावे, असे सांगतानाच राज्यात अनेक ठिकाणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आंदोलनाचं प्रमाण वाढत आहे. त्यानंतर ते आंदोलनाच्या पोस्ट सोशल मीडियावरदेखील टाकल्या जातात. त्यामुळे जातीय आणि धार्मिक तणाव कसे कमी करता येतील याकडे लक्ष देणार आहे. त्यासोबतच सायबर क्राईमकडे बारीक लक्ष देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी