30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रगोदाप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; शेकडो माशांचा तडफडून मृत्यू

गोदाप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; शेकडो माशांचा तडफडून मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून गोदापात्रात शेकडो माशे तडफडून मृत पावल्याची धक्कादायक घटना घडत आहे. यामुळे गोदापात्रातील वाढते प्रदूषण जलचर प्राण्यांसाठी जीवघेणे ठरत असून, गोदा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोदावरी नदीत माशांच्या मरणाची शृंखला आजही सुरूच आहे. आजही हजारो मासे पाण्यावर तरंगत जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. वारंवार सामाजिक कार्यातून जनतेला आवाहन करूनदेखील गोदावरीच्या पात्रात प्रदूषण करणे आजवर थांबलेले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

नुकतेच कोपरगाव येथे गोदावरीच्या पात्रात हजारो मासे मृत पावल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच नाशिकमधील संत गाडगेबाबा पुलाखालील गोदावरी पात्रातही शेकडो मासे तडफडून मृत झाल्याची बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांपासून गोदामाई प्रतिष्ठान हे गोदावरीच्या संरक्षणासाठी झटत आहे. या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, उपाध्यक्ष तथा सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर तसेच संकेत शिंदे व त्यांची टीम नुकतीच पंचवटी येथील गाडगेबाबा पुलाजवळ स्वच्छता अभियानासाठी गेली असता त्यांना गोदापात्रात बरेच मासे मृतावस्थेत आढळून आले. गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषणाने माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळू न शकल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचे या संस्थेच्या पाहणीतून समोर आले. दरम्यान हे पाणी कोणत्या कारखाना किंवा इतर कशामुळे दूषित झाले आहे, हे संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांनी तपासावे. यावर बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे.

दरम्यान गोदमाईचे पाणी दूषित झाले असून, त्यामुळे माशांना हवा तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मासे मरत आहेत. तर मेलेल्या माशांपासून व दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या भागात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे गोदावरीच्या पाण्याचा पुरवठा नाशिक शहरासह अनेक तालुक्यांना, गावांना केला जात आहे. गोदामाई प्रतिष्ठानने ही बाब थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे निवेदन देत कळविली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने दखल घेत यासंदर्भात प्रतिष्ठानच्या ईमेलला उत्तर दिले असून, मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अद्यापही मनपाकडून कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

गोदाप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; शेकडो माशांचा तडफडून मृत्यू

गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे उपाध्यक्ष चिन्मय उदगीरकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गोदाप्रदूषणाबाबत तात्पुरती कार्यवाही न करता मनपा प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. नदीपात्रात सोडलेल्या गटारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. रिव्हर आणि सिव्हर स्वतंत्र झाले पाहीजे. आजघडीला गोदापात्रामध्ये माशांसह अनेक जलचर प्राणी मृत होत असून, आताच दखल घेतली नाही तर याचे दुष्परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहे. याचाही मनपा प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे.

हे सुद्धा वाचा : 

सुवर्णसंधी: अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने झाले स्वस्त; जाणून घ्या नवे दर

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका ‘ही’ कामं !

अक्षय्य तृतीयेच्या आधी ‘या’ अशुभ गोष्टी घरातून काढून टाका; समृद्धी वाढेल

Godavari river pollution problem; Hundreds of fish died, Godavari river pollution problem, Hundreds of fish died in godavari river

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी