30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeअक्षय्य तृतीयेच्या आधी 'या' अशुभ गोष्टी घरातून काढून टाका; समृद्धी वाढेल
Array

अक्षय्य तृतीयेच्या आधी ‘या’ अशुभ गोष्टी घरातून काढून टाका; समृद्धी वाढेल

अक्षय तृतीयेच्या दिवशी तुटलेले झाडू, फाटलेले जोडे, चप्पल बाहेर फेकून द्याव्यात. त्याचप्रमाणे देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे. असं न केल्यास आल्यापावली माता लक्ष्मी घराच्या उंबरठ्यातून निघून जाईल.

अक्षय तृतीया हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी केलेले शुभ कार्य अक्षय फळ देते, म्हणून लोकं या दिवशी सोने-चांदी, घर-गाडी इत्यादी खरेदी करतात. अक्षय्य तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, मुंडण करणे, नवीन व्यावसाय सुरू करणे इत्यादींसाठी एक शुभ दिवस आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते. यंदा 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. तसेच यावेळी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ संयोग घडत आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. म्हणूनच या दिवशी सोने खरेदी करणे किंवा नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. मात्र, या दिवशी काही अशुभ गोष्टी घराबाहेर टाकल्या पाहिजेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुटलेले झाडू, फाटलेले जोडे, चप्पल बाहेर फेकून द्याव्यात. त्याचप्रमाणे देवदेवतांच्या तुटलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे. असं न केल्यास आल्यापावली माता लक्ष्मी घराच्या उंबरठ्यातून निघून जाईल.

तुटलेला किंवा जुना झाडू – झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. शास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात तुटलेला झाडू असेल तर घरातील आशीर्वाद संपतात. माँ लक्ष्मीच्या उपासनेचे फळही मिळत नाही. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात ठेवलेला तुटलेला झाडू किंवा जुना झाडू बाहेर फेकून द्यावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात आशीर्वाद राहतात.

फाटलेले जुने शूज-चप्पल- फाटलेले जुने जोडे आणि चप्पल घरात गरिबी आणतात. घरातील फाटलेल्या चप्पलांमुळे माता लक्ष्मी दारात येते आणि परत जाते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात ठेवलेले फाटलेले जोडे आणि चप्पल बाहेर फेकून द्याव्यात.

तुटलेली भांडी- घरातील तुटलेली भांडी कुटुंबात अशांतता निर्माण करतात आणि देवी लक्ष्मी वास करत नाही. याशिवाय तुटलेली भांडी देखील घरात नकारात्मकता आणतात. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुटलेली भांडी घराबाहेर फेकून द्यावीत.

घाणेरडे कपडे- धार्मिक मान्यतेनुसार मां लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. घरातील स्वच्छतेमुळे मां लक्ष्मी आकर्षित होते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घर स्वच्छ ठेवा. घरामध्ये खोटी भांडी, घाणेरडे आणि न धुलेले कपडे ठेवू नका.

कोरडे पडलेले रोपटे – जर तुम्ही तुमच्या घरात रोपे लावली असतील. जर ती झाडे सुकत असतील किंवा सुकली असतील तर त्यांना जमिनीखाली गाडून टाका किंवा नदी किंवा वाहत्या पाण्यात वाहू द्या. कारण कोरड्या झाडांमुळे घरात वास्तुदोष होतो. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. कोरड्या रोपाला घरापासून दूर ठेवल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि जीवनात प्रगती होते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराबाहेर फेकून द्या.

हे सुद्धा वाचा:

गुढीपाडवा विशेष: वर्षभर चैतन्य मिळवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी..!

संकटमोचन मारुतीला प्रसन्न करण्यासाठी आज करा ‘हे’ खास उपाय; नक्कीच यश मिळेल

हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्त्व; जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणे

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘लय भारी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Akshaya Tritiya 2023, Remove these things before Akshaya Tritiya, Akshaya Tritiya, hindu mythology

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी