29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रIAS अधिकाऱ्याचे अविरत कार्य, 'कोरोना' काळात एकही दिवस रजा न घेता कार्यरत

IAS अधिकाऱ्याचे अविरत कार्य, ‘कोरोना’ काळात एकही दिवस रजा न घेता कार्यरत

टीम लय भारी

पुणे : जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या डॉ. राजेश देशमुख यांनी एकही सुट्टी न घेता काम केले आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत सुद्धा त्यानी एकही सुट्टी घेतली नाही. पुण्यातील तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात बदली झाल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारला. त्यादिवसापासून गुरुवार पर्यंत त्यांच्या कामाला एक वर्ष पूर्ण होत आहे (The relentless work of the IAS officer, working without a single day off during the ‘Corona’ period).

नेहेमीच्या सातबाऱ्यांच्या कामांसोबतच कोरोना संदर्भातही सगळ्यांना त्यांनी कमला जुंपले. इ-फेरफार, सातबारा आणि त्यातील दुरुस्त्या, पाणंद रस्ते यांच्यावर काम केले. त्याच बरोबर पुण्यात रेमेडिसिवीर आणि प्राणवायूचाही तुटवडा भासणार नाही याची काळजी त्यांनी पुरेपूर घेतली.

IAS होण्यापेक्षा आयुष्य अनमोल आहे, सनदी अधिकाऱ्यांनी तरूणांना सांगितला मंत्र

अखेर MPSC ची परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा

 IAS officer
जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या डॉ. राजेश देशमुख यांनी एकही सुट्टी न घेता काम केले आहे

तलाठ्यांपासून प्रांत अधिकाऱ्यांपर्यंत कुणालाही उसंत त्यांनी या वर्षभरात मिळू दिलेली नाही. प्रत्येक आठवड्याला बैठक घेतली जाई व आठवड्याच्या कामाचा आढावा गघेऊन इतर कामाचा पाठपुरावा केला जाई. त्याचबरोबर वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न त्यांनी सोडवले. वर्षानुवर्षे चालू असलेल्या पुणे मेट्रोच्या जागेचा प्रश्न त्याचबरोबर चांदणीचौकाचे रखडलेले भूसंपादन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, तसेच पुणे रिंगरोडसाठीची कामे त्यांनी अवघ्या ४ महिन्यात पूर्ण करून घेतली.

कोरोनाकाळानंतर पुणे राज्य हे फेरफारनोंदीत बाविसाव्या क्रमांकावर होते. ते आता अकराव्या क्रमांकावर आले आहे. याचे श्रेय डॉ. राजेश देशमुखांना जाते. याबाबतीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पुण्याने आघाडीवर आपले स्थान प्रस्थापित केले आहे.

7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीण परदेशी स्वगृही, पण नियुक्ती दुय्यम ठिकाणी

Meet Roman Saini, who left his IAS officer job after a year to create a Rs 14,000 crore company

ग्रामीण भागाचा दौरा केल्यानंतर डॉ. राजेश देशमुख म्हणाले कि आजही पाणंद जमिनी, शेती रस्त्यांचे बरेच प्रश्न आहेत. त्यामुळे तातडीने बैठक बोलावून विशेष टीम हाती घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर उर्वरित कामना त्वरित सुरुवात करण्याची तयारी त्यांनी ह्यावेळी दाखवली. पीएम किसान योजनेत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची नोंद घेऊन केंद्र शासनाने दिल्लीत त्यांचा गौरव केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी