टीम लय भारी
राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज शुक्रवारी ११ मार्चला तातडीची बैठक पार पडणार आहे. १० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला मिळालेल्या चार राज्यातील विजयानंतर ईडीच्या कारवाईवरुन शरद पवार यांना ईशारा दिला होता. काहीजण ईडीच्या कारवाईना धार्मिक रंग देत असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा निशाणा मोदींनी पवारांवर साधला होता.त्यामुळे एकंदरीत पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीत जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिला. याच निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तातडीची बैठक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.